जन्मास सोबतीला पुरले कुणीच नाही
माझ्याशिवाय माझे उरले कुणीच नाही
आकाश चांदण्यानी भरले सदैव माझे
ध्रुवासमान तेथे ठरले कुणीच नाही
सारेच कातडीला लावून स्पर्श गेले
रक्तापर्यंत माझ्या शिरले कुणीच नाही
शिकलो, प्रवास कैसा हा एकटा करावा
हातात हात जेव्हा धरले कुणीच नाही
तूही निरोप घेता, हसलीस गोड जेव्हा
डोळ्यातूनी तुझ्या का, झरले कुणीच नाही...?
माझ्याशिवाय माझे उरले कुणीच नाही....